मला आठवतं... माझी पणजी, आज्जी आणि बर्याच वेळा आईसुद्धा असे बरेच अलिखित नियम किंवा उपाय (ज्याच्या शास्त्रीय आधार त्यांनासुद्धा माहित नव्हता.) किंवा प्रथा सांगायचे. पुर्वीच्या लोकांमध्ये हे खुप होतं. ते अंधश्रद्ध नव्हते पण ह्या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जगण्यात अगदी सहज यायच्या... मागच्या पिढीने सांगितल्या म्हणुन पुढे... कुणाच्या चुका काढायच्या म्हणून नाही... पण गंमत यायची ह्या सगळ्यातुन. मला आठवत आहेत त्याची यादी करत आहे. तुम्हाला माहित असलेल्या ह्यात भर टाका... शास्त्रीय आधार माहीत असेल तर तो पण सांगा... गंमत म्हणून...
१. शनिवारी केस कापायला जायचं नाही. रात्री नखं कापायची नाहीत.
२. कुणाला बाहेरुन यायला उशीर होत असेल तर उंबर्यावर डावीकडे मीठ ठेवायचं.
३. ज्याची तुम्ही वाट बघत आहात त्याचं जेवणाचं ताट वाढून ठेवायचं नाही, त्याला यायला अजून उशीर होतो.
४. बाहेर जाणार्याला ’कुठे जातोस’ म्हणुन मागुन विचारायचं नाही, काम होत नाही.
५. बाहेर जाणार्याने ’मी जातो’ म्हणायचं नाही... ’मी येतो’ म्हणायचं.
६. पालथी मांडी घालून पुजेला बसायचं नाही. हे कदाचित नमाज पालथ्या मांडीने करतात म्हणुन म्हणत असावेत.
७. कावळा अंगाला धडकला तर मोठा अपशकुन होतो. माझ्या मित्राच्या आईने कसलीतरी पुजा सुचवली होती कावळा धडकल्यावर.
७अ. हाच कावळा अंगावर शिटला तर मात्र शकुन होत असे. हे काय लॊजीक आहे माहीत नाही ब्वा.
८. कुत्रा किंवा मांजर समोर असताना जेवायला बसू नये.
९. मोलकरीण किंवा घरकाम करणारे लोक किचनमध्ये आले तर अन्न झाकून ठेवावं. काही गोडधोड केलं असेल तर त्यांनासुद्धा शेअर करावं. अन्नाला वासना लागून राहते म्हणुन.
१०. लहान बाळाला पहिल्या काही महिन्यात नविन कपडे घालायचे नाहीत... विकतही घ्यायचे नाहीत. बाळाचा जन्म व्हायच्या आधी काहीही खरेदी करायची नाही.
११. शनिवारी तेल विकत आणायचं नाही, हरभरा-डहाळा खायचा नाही, लोखंडाच्या कढईमध्ये पिठलं करायचं नाही. नविन काम सुरु करायचं नाही.
१२. चिमट्याचा, कात्रीचा, रिकाम्या भांड्यांचा आणि चपलांचा आवाज करायचा नाही.
१३. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी कडकडीत सात वाजता अंघोळीला जायचं नाही किंवा जेवायलासुद्धा बसायचं नाही.
१४. नुसता पांढरा भात ताटात वाढायचा नाही. आधी मीठ वाढायचं. (ह्याचं कारण श्राद्धाला बिनामिठाचा भात ताटात वाढतात हे होतं.)
१५. माहेरवाशिणीनं बुधवारी सासरी परत जायचं नाही. (ही त्या माहेरी आलेल्या मुलीनी आणि तिनं अजुन राहावं असं वाटणार्या आईनं केलेली गेम असणार.)
१६. चप्पल उलटी पडली की भांडणं होतात. (अर्थात उलटी पडलेली चप्पल घाणेरडीच दिसते. ती बघूनच चप्पलवाल्याला हाणावं वाटून भांडणं होणार ना.)
१७. देवापुढचा दिवा तेल संपून विझला की तो ’विझला’ म्हणायचं नाही.. दिवा ’शांत झाला’ म्हणायचं.
१८. रात्रीच्या जेवणात केलेला सगळा भात आणि घरातलं दूध कधीच संपु द्यायचं नाही. (घर म्हणुन थोडं तरी असू द्यावं म्हणे.)
१९. एखादी गोष्ट बोलल्याच्या दुसर्याच क्षणी दारावरची घंटा, फोनची बेल वाजली किंवा त्याच वेळेस गेलेले लाईट आले की... ’बघ सत्य आहे’. म्हणजे जे बोललं ते खरंच आहे.
२०. एखाद्याचं... विशेषत: मुलांचं कौतुक केलं की ’डाव्या पायाकडं बघ’ असं त्याला सांगायचं म्हणजे दृष्ट लागत नाही.
२१. शनिवारी नारळ फोडायचा नाही. नारळ उभा फुटला किंवा नासका निघाला की ’पावला’ म्हणायचं. (हे कदाचित फोडणार्याने शिव्या खाऊ नयेत म्हणुन म्हणत असावेत.)
२२. लिंबू उभं चिरायचं नाही. लिंबू कापलं म्हणायचं नाही. चिरलं म्हणायचं.
२३. पाणी घेतल्याशिवाय जेवायला बसायचं नाही. (हे कदाचित ठसका लागला तर असावं.) पाणी पिताना पेला डाव्या हातात असला तरी उजवा हात नुसता खालून लावायचा.
कितीतरी आहेत अजुन. सध्या येवढ्याच आठवत आहेत. ह्या गोष्टींचा अट्टाहास नसायचा... कुणाचा जीव घेणारी अंधश्रद्धा नसायची, पण आपल्या पोराबाळांची काळजी करणार्या आईची भाबडी माया मात्र स्पष्ट दिसायची. आपल्या आज्जी किंवा आईचा एखादा गोंडस वेडगळपणा आपण जेवढ्या आपलेपणाने घेतो तसाच हा विषय घ्या. उगाच धार्मिक, जातीय किंवा अंधश्रद्धेची काशी करुन मजा कमी करुन घेऊ नये ही विनंती...!!
प्रणव.
१. शनिवारी केस कापायला जायचं नाही. रात्री नखं कापायची नाहीत.
२. कुणाला बाहेरुन यायला उशीर होत असेल तर उंबर्यावर डावीकडे मीठ ठेवायचं.
३. ज्याची तुम्ही वाट बघत आहात त्याचं जेवणाचं ताट वाढून ठेवायचं नाही, त्याला यायला अजून उशीर होतो.
४. बाहेर जाणार्याला ’कुठे जातोस’ म्हणुन मागुन विचारायचं नाही, काम होत नाही.
५. बाहेर जाणार्याने ’मी जातो’ म्हणायचं नाही... ’मी येतो’ म्हणायचं.
६. पालथी मांडी घालून पुजेला बसायचं नाही. हे कदाचित नमाज पालथ्या मांडीने करतात म्हणुन म्हणत असावेत.
७. कावळा अंगाला धडकला तर मोठा अपशकुन होतो. माझ्या मित्राच्या आईने कसलीतरी पुजा सुचवली होती कावळा धडकल्यावर.
७अ. हाच कावळा अंगावर शिटला तर मात्र शकुन होत असे. हे काय लॊजीक आहे माहीत नाही ब्वा.
८. कुत्रा किंवा मांजर समोर असताना जेवायला बसू नये.
९. मोलकरीण किंवा घरकाम करणारे लोक किचनमध्ये आले तर अन्न झाकून ठेवावं. काही गोडधोड केलं असेल तर त्यांनासुद्धा शेअर करावं. अन्नाला वासना लागून राहते म्हणुन.
१०. लहान बाळाला पहिल्या काही महिन्यात नविन कपडे घालायचे नाहीत... विकतही घ्यायचे नाहीत. बाळाचा जन्म व्हायच्या आधी काहीही खरेदी करायची नाही.
११. शनिवारी तेल विकत आणायचं नाही, हरभरा-डहाळा खायचा नाही, लोखंडाच्या कढईमध्ये पिठलं करायचं नाही. नविन काम सुरु करायचं नाही.
१२. चिमट्याचा, कात्रीचा, रिकाम्या भांड्यांचा आणि चपलांचा आवाज करायचा नाही.
१३. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी कडकडीत सात वाजता अंघोळीला जायचं नाही किंवा जेवायलासुद्धा बसायचं नाही.
१४. नुसता पांढरा भात ताटात वाढायचा नाही. आधी मीठ वाढायचं. (ह्याचं कारण श्राद्धाला बिनामिठाचा भात ताटात वाढतात हे होतं.)
१५. माहेरवाशिणीनं बुधवारी सासरी परत जायचं नाही. (ही त्या माहेरी आलेल्या मुलीनी आणि तिनं अजुन राहावं असं वाटणार्या आईनं केलेली गेम असणार.)
१६. चप्पल उलटी पडली की भांडणं होतात. (अर्थात उलटी पडलेली चप्पल घाणेरडीच दिसते. ती बघूनच चप्पलवाल्याला हाणावं वाटून भांडणं होणार ना.)
१७. देवापुढचा दिवा तेल संपून विझला की तो ’विझला’ म्हणायचं नाही.. दिवा ’शांत झाला’ म्हणायचं.
१८. रात्रीच्या जेवणात केलेला सगळा भात आणि घरातलं दूध कधीच संपु द्यायचं नाही. (घर म्हणुन थोडं तरी असू द्यावं म्हणे.)
१९. एखादी गोष्ट बोलल्याच्या दुसर्याच क्षणी दारावरची घंटा, फोनची बेल वाजली किंवा त्याच वेळेस गेलेले लाईट आले की... ’बघ सत्य आहे’. म्हणजे जे बोललं ते खरंच आहे.
२०. एखाद्याचं... विशेषत: मुलांचं कौतुक केलं की ’डाव्या पायाकडं बघ’ असं त्याला सांगायचं म्हणजे दृष्ट लागत नाही.
२१. शनिवारी नारळ फोडायचा नाही. नारळ उभा फुटला किंवा नासका निघाला की ’पावला’ म्हणायचं. (हे कदाचित फोडणार्याने शिव्या खाऊ नयेत म्हणुन म्हणत असावेत.)
२२. लिंबू उभं चिरायचं नाही. लिंबू कापलं म्हणायचं नाही. चिरलं म्हणायचं.
२३. पाणी घेतल्याशिवाय जेवायला बसायचं नाही. (हे कदाचित ठसका लागला तर असावं.) पाणी पिताना पेला डाव्या हातात असला तरी उजवा हात नुसता खालून लावायचा.
कितीतरी आहेत अजुन. सध्या येवढ्याच आठवत आहेत. ह्या गोष्टींचा अट्टाहास नसायचा... कुणाचा जीव घेणारी अंधश्रद्धा नसायची, पण आपल्या पोराबाळांची काळजी करणार्या आईची भाबडी माया मात्र स्पष्ट दिसायची. आपल्या आज्जी किंवा आईचा एखादा गोंडस वेडगळपणा आपण जेवढ्या आपलेपणाने घेतो तसाच हा विषय घ्या. उगाच धार्मिक, जातीय किंवा अंधश्रद्धेची काशी करुन मजा कमी करुन घेऊ नये ही विनंती...!!
प्रणव.
No comments:
Post a Comment